Friday, September 18, 2009

मी संध्येच्या ........काठावर

काय होते सांगू तुम्हाला
जेव्हा ढळते ... जगण्यावर निष्ठा
अन मरणही वाटे परके तेव्हा...
आशेवरती..मी विणलेले
सुखावरती रेखाटलेले
जगणेच.. जेव्हा होते ......धूसर
अस्तित्वाला मिटवून टाकून
शून्य..शून्य होण्यासाठी
हळवे मनही होते....आतुर
झोकून देतो.....काळोख्या रात्री...
जगण्याची मी सगळी आस
हात पसरतो....घेतो भरून
अस्तित्वाचा अंतीम श्वास
काळ्या कभिन्न अंधारावर...रोखतो
मी माझी निर्मम नजर....तेव्हा
तेव्हा...... ती गर्भार रात्र..
का खुणाविते मला?
संकेतांनी...जीवनाच्या??
................................
................................
दिवसही नाही....रात्रही नाही
दोहोंच्याही.....
......... मी सीमेवर
मी संध्येच्या काठावर अन
सोबत माझे...
......... मन हे कातर

No comments: