Wednesday, September 2, 2009

आचार्य......

(अण्वस्त्रांचे समर्थन करणार्‍या शास्त्रज्ञासाठी)
असहिष्णु धर्मांधतेचा विषारी प्रचार करणार्‍या,

स्वाभिमानशून्य, अपरिपक्व सत्ताधिशांच्या,

आक्रमक, हिंसक वृत्तीचे प्रतिक बनताहात, आचार्य तुम्ही,

ज्ञानी, समर्थ्,शस्त्रांचे अधिपती असताल तरिही...

हे शुक्राचार्य बनणे सोडा तुम्ही

लाकूड उपकारीच असतं सर्वार्थाने आचार्य,

पण तत्वांचं विखारी लखलखतं धारदार पातं

त्याला जोडलं जातं तेव्हा ते स्वतःच्याच कुळाचा,

अस्तित्वाचाच, घातही करतं

शस्त्राने सामर्थ्याचे प्रदर्शन करता येते पण

सामर्थ्य निर्माण करता येत नाही ,

दहशतीने , धाकाने युध्द टाळले जावू शकते...

पण शांतता प्रस्थापित होतेच असे नाही

युध्दाचा मार्ग संपला की द्वेषाला फुटतात दहशतीचे धुमारे

मोठ्या शस्त्रांनी गर्दीशी लढता येतं .... आचार्य

व्यक्तीशी लढता येतं नाही अन द्वेषाने......

शत्रूशी लढता येते....

पण वृत्तीशी लढता येतं नाही

अणु -विभाजनातूनच आपण सामर्थ्य निर्माण करतो आहोत..... अण्वस्त्रांप्रमाणे

अन आता सामर्थ्यातून विभाजन

मनां-मनांना एकत्र आणण्यासाठी.... सर्वाधिक ...आचार्य,

शस्त्रांची नव्हे .....

प्रेमाची गरज असते

1 comment:

Mahendra said...

No Comments...
Just see these photographs.. Please see all the pics..
http://www.boston.com/bigpicture/2009/08/hiroshima_64_years_ago.html