Saturday, September 12, 2009

कारण .... मित्रा...

एवढ्या सहजपणे निष्कर्षांवर का पोहचतो आपण्?
सत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण ?
जगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा
तेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची क्षमता.
अन प्रेमाशिवाय माणूसच नव्हे तर जगही समजत नाही आपल्याला
स्वतःच्या क्षुद्र अहंकारापेक्षाही जग खूप मोठं आहे..... राजा
पण.....समर्पणाच्या क्षमतेशिवाय हे भान येणं खूप अवघड आहे.
म्हणून तुला सांगतो मित्रा की
अस्तित्वाच्या व्यापकतेत.... स्वतःच्या संवेदनांना
इतकं कुरवळणं बरं नव्हे.
अहंकार वेगळं करतो आपल्याला समष्टीपासून
अन आपण बसतो त्याला कुरवाळीत
स्वतःची ओळख म्हणून
तुझ्या माझ्या कल्पनेपेक्षाही खूप
निरपेक्ष असतं जीवन, दोस्त
म्हणून पूर्वग्रहांच्या द्रुष्टीने जग समजत नाही
आपणच जगण्याला पारखे होतो.
जाणीवेच्या विश्वातील हे फक्त चार क्षण आपल्या हातात आहेत, मित्रा
पण हरकत नाही! तू येईपर्यंत युगान्तापर्यंत वाट बघण्याची..
माझी तयारी आहे...कारण...
माझ्या प्रिय मित्रा....
मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आहे

No comments: