Saturday, August 22, 2009

खळबळ

वावटळ झेललेल्या पानसळीला अजून पंख वा-याने झंकारू नकोस

दोन घटका येवून उडून जातोस पाखरा , अचानक

कधी जाणलयं ........... या झाडाचं एकाकीपण

तुझ्या येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची हुरहुरच

जास्त लागते मनाला

अरे, वास्तवाच्या जमीनीला मूळं बांधली आहेत म्हणून

नाही येता येत उडून तुझ्याबरोबर

पण तरीही मी शांत आहे कारण

मला माहितेयं , की उडालास आकाशात चार क्षण

तरी तुझं हक्काचं , निवा-याचं ठिकाण मीच आहे

पण हे दुराव्याचं नातं नाही रे सहन होत

तुला मला सांधणा-या या अप्रतीघाताची अमूर्तता ,

लक्ष लक्ष भाल्याची टोके बनून , विदीर्ण करते मनाला

अवघडं होतं रे , एवढं सारं सहन करून

पुन्हा स्थितप्रज्ञासारखं उभं राहाणं

टाळूनही मग ही खळबळ व्यक्त होते

इतरांना वाटते की , ही पानांची सळसळ आहे

No comments: