Friday, August 21, 2009

कुमारी माता

अनाचार नाव ज्याला, त्याला आवरू मी कसे
क्षण धुंद आवेगाचा, त्याला पापी म्हणू कसे
त्या क्षणांना ना नाते, ना अस्तित्वाची जाणं
बंद कळीने झेललं, दवातलं प्रीतीगाणं
तुझं वळीवाचं देणं, रुजे तापल्या कुशीत
नवजन्माचा आनंद, दाटे ग्रीष्माच्या मुशीत
आता नाही मला क्षिति, जगदोषांची जराही
रुजलेली प्रीत वेडी घेई सृजन भरारी

No comments: